पुणे : आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजप आता छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे 40-40 आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवे ते मिळत नाही, तर दुसरीकडे 1-1 आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय, असा टोला राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवरून आमदार रोहित पवार यांनी टि्वटद्वारे लगावला.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे विविध पक्षांकडून आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रोहित पवार यांनीदेखील टि्वटच्या माध्यमातून टीका केली. पवार यांनी म्हटले, असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातील मनात मांडे खात असले, तरी उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात. या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष 'नया है वह' असेच म्हणत असतील.
हेही वाचा