महिनाभरात कर्जमाफीचा निर्णय; 'शेतकरी मित्र' योजनेतून ११ हजार तरुणांना मिळणार रोजगार; कृषिमंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा

महिनाभरात कर्जमाफीचा निर्णय; 'शेतकरी मित्र' योजनेतून ११ हजार तरुणांना मिळणार रोजगार; कृषिमंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा
Published on
Updated on

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुढच्या एका महिन्याच्या आत कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला जाणार असून, खुद्द मुख्यमंत्री याची घोषणा करतील, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तसेच कृषी विभागाच्या योजना घराघरात पोहोचवण्यासाठी आता 'शेतकरी मित्र' ही नवी संकल्पना राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पेरणी पुर्व कृषी आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

महिनाभरात कर्जमाफीचा निर्णय; 'शेतकरी मित्र' योजनेतून ११ हजार तरुणांना मिळणार रोजगार; कृषिमंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा
Maharashtra Onion Mahabank: राज्यात उभारणार कांदा महाबँक; समृद्धी महामार्गावर पाच ठिकाणी सुविधा

कर्जमाफीची तयारी पूर्ण; मुख्यमंत्र्यांकडून होणार घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. याबाबत माहिती देताना मंत्री भरणे म्हणाले की, "कर्जमाफीबाबतची सर्व तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. एका महिन्याच्या आत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे." याशिवाय, मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची मदतही संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महिनाभरात कर्जमाफीचा निर्णय; 'शेतकरी मित्र' योजनेतून ११ हजार तरुणांना मिळणार रोजगार; कृषिमंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा
Hingoli Congress protest : हिंगोलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

११ हजार 'शेतकरी मित्रां'ची होणार नियुक्ती

राज्यातील कृषी सहाय्यकांच्या मदतीसाठी आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'शेतकरी मित्र' योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात ११ हजार शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाईल. जिल्हास्तरावर निवड प्रक्रिया पार पाडून या नियुक्त्या केल्या जातील. या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती वेळेत उपलब्ध होईल.

महिनाभरात कर्जमाफीचा निर्णय; 'शेतकरी मित्र' योजनेतून ११ हजार तरुणांना मिळणार रोजगार; कृषिमंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा
Mango-Cashew Farmers Protest: मुंबईत १५ मे रोजी आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

एल-निनोचे संकट आणि खरीप नियोजनासाठी अधिकारी 'फिल्ड'वर

वातावरणातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या 'एल-निनो'च्या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. मंत्री भरणे यांनी आज अधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घेऊन खरीप हंगामाचे नियोजन केले. येत्या काळात चारा आणि खतांचा तुटवडा भासू नये, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर (फिल्डवर) जाऊन मार्गदर्शन करावे, असे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news