ते पुढे म्हणाले, विकास झाला म्हणून सर्वत्र चर्चा असते, मला विचारायचे आहे की, नक्की विकास कशाचा झाला ? विकास झाला तो रस्त्याचा ! मला सांगायचंय… रस्त्याचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होत नाही. रस्त्याच्या पलीकडेसुध्दा विकास आहे, तो म्हणजे झोपडपट्टीचा. या भागांचा विकास करण्याची जबाबदारी शासनाने बिल्डरांना दिली आहे, हे बिल्डर काय विकास करणार ? झोपडपट्टी भागातील लोकांचा विकास बिल्डरांनी नव्हे, तर शासनाने केला पाहिजे. तरच गरीब झोपडपट्टी भागातील विकास होणार आहे. तसेच, भाजपने जाहीर केलेय संविधान बदलणार, हुकूमशाही आणणार, याला आपण सर्वांनी एकत्र येऊन उत्तर द्यायला हवे.