तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कात्रज-वडगाव मावळ ही थेट बससेवा प्रवाशांसाठी सोयीस्कर होती. परंतु सदर बससेवा अचानक बंद करण्यात आली असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांना त्याची कारणे न देता ही थेट बससेवा अचानक बंद केली. यामुळे मावळातील प्रवाशांना दोन ते तीन वेळा बस बदलत दुप्पट भाडे देवून प्रवास करावा लागत आहे. हे गैरसोयीचे असून अर्थिक दृष्ट्याही त्रासदायक झाले आहे. हा त्यांच्यावर अन्याय असून त्यांना मनस्ताप होत आहे.
मावळात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे. शैक्षणिक आणि आरोग्य सुविद्या भरपूर आहेत, यामुळे कात्रज परिसरातील प्रवाशांचे मावळात आणि मावळ परिसरातील प्रवाशांचे कात्रज परिसरात येणे-जाणे मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कामगार, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, वृध्द, महिलांना तसेच पास धारकांना कात्रज वडगाव मावळ ही बससेवा सोयीस्कर होती. ही बससेवा पुन्हा चालू करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
कात्रज-वडगाव मावळ थेटबससेवा बंद केल्यामुळे मावळात येणा-या -जाणा-या प्रवाशांना २-३वेळा बस बदलावी लागते.यामुळे त्यांचा वेळ जात असून अर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.तरी सदर बस चालू करण्यात यावी.
– दिलीप डोळस, सामाजिक कार्यकर्ता तळेगाव दाभाडे.
कात्रज ते वडगाव मावळ ही थेट बससेवा खंडीत केली असल्यामुळे अनेक कात्रजकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनेक वेळा बस बदलावी लागत आहे यामुळे जेष्ठ नागरिक,वृध्द,महिला यांना गैरसोयीचे होत आहे याची पीएमपीएमएल प्रशासनाने दखल घ्यावी.
-पल्लवी गवारे, सामाजिक कार्यकर्त्या तळेगाव दाभाडे.
हेही वाचा