India Population Growth 2050: भारताची लोकसंख्या २०५० पर्यंत १.७ अब्जांवर; मात्र लोकसंख्यावाढीचा वेग सातत्याने मंदावणार

तरुण लोकसंख्येमुळे आर्थिक विकासाची संधी; वाढते आयुर्मान, घटता प्रजननदर आणि बदलती लोकसंख्या रचना अधोरेखित
Population Growth
Population GrowthPudhari
Published on
Updated on

गणेश खळदकर

पुणे: भारतात १९७५ ते २०१० या काळात लोकसंख्या दुप्पट होऊन १.२ अब्जांवर पोहचली. लोकसंख्या वाढत असली तरी, तिच्या वाढीचा दर लक्षणीयरीत्या मंदावला आहे. १९७२-१९८३ दरम्यान तो वार्षिक २.३ टक्के होता, तर २०२३ मध्ये तो अंदाजे ०.८९ टक्के इतका आहे. सध्याच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत लोकसंख्या १.७ अब्जांपर्यंत पोहचणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Population Growth
Pune Primary Schools Morning Session: मतदार यादी पुनरीक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ बदलली; १३ ते ३० जुलै सकाळच्या सत्रात वर्ग

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे सहाव्या भागाइतकी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड पॉप्युलेशन डॅशबोर्ड'नुसार १ जुलै २०२३ रोजी भारताची लोकसंख्या १.४२८ अब्जांच्या (१४२.८ कोटी) वर गेली आणि भारताने चीनला मागे टाकले. भारत हा तुलनेने तरुण लोकसंख्या असलेला देश आहे.

Population Growth
Maharashtra School Monsoon Safety: मान्सूनमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य; धोकादायक वर्गखोल्या तात्काळ बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश

तरीदेखील भारतात लोकसंख्येच्या रचनेत हळूहळू बदल (डेमोग्राफिक ट्रान्झिशन) होत आहेत. २०२४ पर्यंत भारताचे मध्यम वय अंदाजे २९.८ वर्षे होते, तर चीनमध्ये हे प्रमाण ४०.२ वर्षे होते. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अंदाजानुसार, ६८ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वयोगटातील आहे. यामुळे 'लोकसंख्याशास्त्रीय लाभांश' मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणावरील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या आर्थिक विकासाला चालना देणार आहे. सध्या मुलांच्या संख्येत घट होत आहे, ५ वर्षांखालील लोकसंख्येने २००७ मध्ये आणि १५ वर्षांखालील वयोगटाने २०११ मध्ये उच्चांक गाठला असल्याचे दिसून आले आहे.

Population Growth
Tukaram Maharaj Palkhi: ‘तुकाराम महाराज’च्या जयघोषाने नाना पेठ दुमदुमले; पालखी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

भारत हा अत्यंत वैविध्यपूर्ण देश आहे, येथे हजारो वांशिक गट आणि चार प्रमुख भाषा-कुळे (इंडो-युरोपियन, द्रविडियन, ऑस्ट्रो-एशियाटिक आणि तिबेटी-बर्मन) आढळतात. या देशात निहाली आणि बुरुशास्की यांसारख्या 'भाषिकदृष्ट्या स्वतंत्र' भाषा, तसेच अँग्लो-इंडियन आणि सिद्दी यांसारखे विशिष्ट अल्पसंख्याक समुदायही आहेत. भारतात अनेक दशकांच्या घसरणीनंतर मानवी लिंग गुणोत्तरात वाढ दिसून आली आहे. २०११ मध्ये हे प्रमाण दर एक हजार पुरुषांमागे ९४३ स्त्रिया इतके होते, तर २०२३ मध्ये ते दर एक हजार स्त्रियांमागे १ हजार ६० पुरुष किंवा अंदाजे दर एक हजार पुरुषांमागे ९४४ स्त्रिया इतके असल्याचे अनुमान आहे.

Population Growth
Dnyaneshwar Maharaj Palkhi: ‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषाने पुणे दुमदुमले; ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

नागरिकांचे आयुर्मान वाढले

देशात २०२६ च्या आकडेवारीनुसार, सध्या अंदाजे १४१ कोटी १३ लाख १६ हजारांहून अधिक लोक राहत आहेत. देशातील लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले असून, ७२ वर्षे ३ महिने आहे. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे आयुर्मान अधिक आहे. पुरुष सरासरी ७० वर्षे, तर महिला ७३ वर्षे जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे. एक हजार बालकांमध्ये सध्या साधारण २२ ते २३ बाळांचा मृत्यू होत आहे. ही चिंताजनक बाब असली तरी गेल्या काही वर्षांचा विचार केला तर सध्या गेल्या काही वर्षांपेक्षा परिस्थिती सुधारली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या विविध कारणांमुळे स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम झाला आहे, तर मुलांचे महागलेले संगोपण यामध्ये शिक्षण, आरोग्यासह अन्य गोष्टींचा विचार करून एक किंवा दोनच अपत्ये जन्माला घालण्याकडे लोकांचा कल आहे. तसेच आरोग्याच्या चांगल्या सुविधांमुळे मुले दगावण्याची भीती कमी झाली आहे. परिणामी, देशातील लोकसंख्यावाढीचा दर लक्षणीयरीत्या मंदावला आहे. येत्या काळात तो आणखी कमी झालेला दिसेल.

प्रा. डॉ. अमित धोर्डे, भूगोल विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news