![मानवाकृती रोबोट 2028 पर्यंत पुण्यात तयार होणार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2Frobot.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
माणूस रस्ता ओलांडतो तेव्हा तो त्याचा मेंदू आणि विवेकाचा वापर करतो. ही भावना ह्युमनॉडमध्ये टाकयची आहे. त्यासाठी खूप वेगळ्या प्रकारचे शेकडो सेंसर्स त्यात टाकावे लागतील. यावर आमचे संशोधन सुरू आहे. सर्वच कामे मानवरहित करावीत का हादेखील आमच्यासमोर मोठा यक्षप्रश्न आहे. मनुष्याचा सहभाग प्रत्येक ठिकाणी असायला हवा अगदी जेथे अशक्य आहे तेथेच हा ह्युमनॉईड किंवा स्वयंचलित रोबोटचा वापर करावा हा दुसरा मत प्रवाह आम्हा शास्त्रज्ञांत आहे.– डॉ. शैलेंद्र गाडे, संचालक, आर्ममेन्ट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टिम,डीआरडीओ, पुणेसमजा, चहाचा गरम कप उचलायचा असेल, तर तो रोबोट आणि माणूस कसा उचलेल यात खूप फरक आहे. तसेच एखादी नाजूक वस्तू उचलताना माणूस तिचा विचार करून जी सावधानता सहजतेने बाळगतो. ह्याचे सेंसर्स तयार करणे खूप कठीण आहे. माणूस जिना उतरून सहजतेने खाली येतो, बसतो, गप्पा मारतो, उद्यानात सहजतेने वावरतो. या सर्व गोष्टी कृत्रिम मानवात टाकताना एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहेच. पण मानवी विवेक कृत्रिमपणे कसा करणार हेच मोठे आव्हान आमच्या समोर आहे.-डॉ. मकरंद जोशी, संचालक, रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट विभाग, डीआरडीओ
हेही वाचा