Maharashtra Government Corruption Complaints: ‘पैशांशिवाय कामच होत नाही’; सरकारी यंत्रणेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

भूमी अभिलेख, परिवहन विभाग आणि महावितरणमध्ये विलंब, दलालशाही व भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा; कठोर सुधारणांची मागणी
Corruption
CorruptionPudhari
Published on
Updated on

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: अजितदादा हयात असताना सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची कामासाठी छदाम मागण्याची हिंमत होत नव्हती, मागितले तरी देणार-घेणार यांचा राजखुषीचा विषय होता. परंतु आता पैशांशिवाय कामच होत नसल्याचे चित्र असून, सरकारी यंत्रणा बेलगाम झाली आहे.

Corruption
Kesnand Fake Revenue Order Case: केसनंद बनावट महसूल आदेश प्रकरण; चौकशीत मोठे गौप्यस्फोट होण्याची चर्चा

भूमी अभिलेख विभागात तर मोजणीच्या नावाखाली लूट सुरू झाली आहे. भूमी अभिलेख विभाग हा तर दप्तरदिरंगाईचा आणि मानसिक त्रासाचा कळस आहे. जमिनीची शासकीय मोजणीसाठी रीतसर फी भरूनही सहा-सहा महिने तारीख मिळत नाही. तारीख मिळालीच, तर भूमापक (सर्व्हेअर) वेळेवर येत नाही. अनेकदा जमिनीचे नकाशे आणि मोजणीचे कागदपत्रे तयार करताना त्रुटी ठेवल्या जातात. हक्काच्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी किंवा मोजणी नकाशासाठी शेतकऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः लाचार व्हावे लागते. उत्तरार्ध

Corruption
Maharashtra Tobacco Government Offices: जुन्नरच्या शासकीय कार्यालयांत तंबाखूच्या पिचकाऱ्यांचा सुळसुळाट; स्वच्छतेच्या दाव्यांना तडा

परिवहन विभाग

ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन पासिंगसाठी 'एजंट' असल्याशिवाय नागरिक थेट खिडकीवर कामच करू शकत नाही. लहान वाहनांवर उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांना किरकोळ नियम दाखवत रस्त्यावरच तातडीने कारवाई होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे मोठ्या धेंडांसाठी कोणतेही नियम नसल्याचे आरोप वाढले आहेत.

Corruption
Pune Footpath Encroachment: पदपथ नागरिकांसाठी की बांधकाम व्यावसायिकांसाठी? पुणेकरांचा संतप्त सवाल

महावितरण

नवीन वीज कनेक्शन हवे असेल तर कोटेशन भरूनही महिनोनमहिने मीटर मिळत नाही. डीपी जळाला तर तो बदलण्यासाठी शेतकऱ्यांना वर्गणी गोळा करावी लागते. त्यानंतरच काम मार्गी लागत असल्याचे दिसून येते.

Corruption
Pune Monsoon Preparedness Drainage Problem: बाणेर–औंधमध्ये ९० टक्के पावसाळापूर्व कामांचा दावा; तरीही पाणी तुंबण्याची भीती कायम

कायदाच बदलण्याची वेळ

अधिकाऱ्यांसाठी तेथील कर्मचारी उघडपणे लाच मागतात. यात कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ मंडळींचाही वाटा ठरलेला असतो, असे आरोप होतात. दरवर्षी शेकडो अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले जातात, पण पुढे त्यांचे काय होते? त्यांना तात्पुरते निलंबित केले जाते आणि काही महिन्यांनी पुन्हा मोक्याच्या जागेवर बसवले जाते. यातून गुन्हेगार अधिकाऱ्यांचे बळ वाढत आहे. त्यामुळे हा कायदाच बदलण्याची वेळ आल्याची चर्चा वाढू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news