‘या’ पाच बड्या नद्यांच्या खोऱ्यांचे अस्तित्व धोक्यात : पाणीसाठा मोठ्या संख्येने घटला

‘या’ पाच बड्या नद्यांच्या खोऱ्यांचे अस्तित्व धोक्यात : पाणीसाठा मोठ्या संख्येने घटला
पुणे : देशातील दहा मोठ्या नद्यांच्या खार्‍यांपैकी पाच  मोठ्या नद्यांची पाणीपातळी गेल्या दहा वर्षांत धोक्याच्या खाली आली आहे. जागतिक जल दिनानिमित्त देशातील पाणीसाठ्याचा विशेष आढावा घेण्यात आला. त्यात केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात ही चिंताजनक बाब उघड झाली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात केंद्रीय जल आयोगाच्या वतीने देशातील सर्वांत मोठ्या नद्यांच्या खोर्‍यांचा पाणीसाठा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो.
उन्हाळ्यात त्याची तीव्रता अधिक जाणवते. कारण, बहुतांश धरणांतील पाणीपातळी कमी झालेली असते. त्यामुळे थेंब थेंब पाण्याचा हिशेब जल आयोगाला करावा लागतो. देशातील 150 पाणी स्रोतांचे व्यवस्थापन जल आयोग करत असतो. यात काश्मीर ते केरळपर्यंत तर दुसर्‍या बाजूला गुजरात ते पश्चिम बंगाल अशा सर्व राज्यांतील नद्यांच्या खोर्‍यांचा पाण्याचा ताळेबंद ठेवला जातो.
  • भारत एकूण जलसाठा मार्च-2024
  • एकूण – 69.35 टक्के
  • उत्तर भारत (हिमाचल प्रदेश पंजाब, राजस्थान )- 34 टक्के
  • पूर्वोत्तर भारत (आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम  बंगाल, त्रिपुरा, नागालॅन्ड, बिहार)- 51 टक्के
  • पश्चिम  भारत ( गुजरात, महाराष्ट्र) – 43 टक्के
  • मध्य भारत (उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड) – 44 टक्के
  • दक्षिण भारत (आंध—प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू) – 24 टक्के

पेन्ना खोर्‍यात 60 टक्के जलसाठा कमी

संपूर्ण भारताच विचार केला तर जम्मू- काश्मीरपासून सिंधू खोरे, त्याखाली उत्तर प्रदेशपर्यंत गंगेचे मोठे खोरे अर्ध्या देशाची तहान भागवते. यातच नर्मदा आणि तापी आणि साबरमती ही मोठी खोरी आहेत. अनेक छोट्या- मोठ्या नद्या मिळून भारतात 12 पेक्षा जास्त खोरी आहेत. पूर्वोत्तर भारतात ब्रह्मपुत्रेचे खोरे आहे. मध्य भारतात गोदावरी, महानदी आणि दक्षिण भारतात कृष्णा, पेन्ना आणि कावेरी अशी खोरी आहेत. या खोर्‍यांत गेल्या दहा वर्षांचा पावसाचा ताळेबंद तपासला असता दक्षिण भारतातील मान्सूनमधील पावसाचे प्रमाण कमी होत आहे.  मध्य ते दक्षिण भारतापर्यंत या भागातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सर्वात वाईट अवस्था पेन्ना नदीच्या खोर्‍याची आहे. या नदीतील 60 टक्के पाणीसाठा कमी झालेला आहे.
पाणीसाठ्याचा वापर कसा करतो, त्याची उपलब्धता कशी आहे, यावरच आता जलसाठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. लहान-लहान जलाशये शून्य टक्के पातळीवर येत असतील, तर त्यांना मोठ्या जलाशयातून पाणी आणून जिवंत ठेवले पाहिजे. मोठ्या साठ्यातून लहान साठ्यात पाणी आणणे हाच पर्याय या भीषण परिस्थितीत शक्य आहे.
– अजय कोहिरकर, निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग

हेही वाच

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news