पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यातून आरोग्य, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, बँका, जलसंपदा विभाग, परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेले प्राध्यापक, शिक्षक आदी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचार्यांना वगळण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले. चारही मतदारसंघातील नियुक्त कर्मचार्यांपैकी 10 टक्के म्हणजेच सुमारे सहा हजार कर्मचार्यांनी प्रशिक्षणासाठी दांडी मारली आहे, त्यांनी हलक्यात घेऊ नये, असा इशारा त्यांनी मंगळवारी दिला.