रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावच्या गाड्यांवर मोठी तेलाची कढई ठेवलेली असते. त्यामध्ये दिवसभर भजी, वडे तळले जातात. वारंवार तेल तापत असल्याने त्याचे रासायनिक स्वरूप बदलू लागते. त्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात. अशा तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने घशात खवखवणे, खोकला, अॅसिडिटी असा त्रास सुरू होतो. याशिवाय, शरीरावर दीर्घकालीन परिणामही होतात. एलडीएल नावाचे वाईट कोलेस्टेरॉल वाढून हृदयाला धोका निर्माण होऊ शकते. शरीराचा दाह होणे, स्थूलता, मधुमेह, संधिवात असे आजारही होऊ शकतात. त्यामुळे घरात केलेले पदार्थच खावेत.– अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ