सांगवी(पुणे) : यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिने संपत आले, तरी एकदाही मोठा पाऊस झालेला नसल्याने बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात निरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. शेतीसाठी आवर्तन फिरले, तरीही दुष्काळाची छाया गडद झाल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. आवर्तन येऊन गेल्यावर विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे जमिनीची धग न शमल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे.