

खडकवासला: खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणक्षेत्रात पावसाने पुन्हा हुलकावणी दिली आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या चार दिवसांत धरणसाखळीत 0.21 टीएमसीची घट झाली. धरणसाखळीत रविवारी (दि. 10) सायंकाळी पाच वाजता 25.76 टीएमसी म्हणजे 88.38 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि. 9) पानशेत-वरसगावसह टेमघर खोर्यात पावसाने हजेरी लावली. रविवारी मात्र घाटमाथ्यावरील तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली. (Latest Pune News)
दरम्यान, बुधवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 25.97 टीएमसी पाणी होते. एकीकडे खडकवासलातून शेतीसह पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाण्याची आवक थांबली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत धरणसाखळीत पाण्याची घट झाली.
खडकवासला धरणातील पाणीपातळी रविवारी (दि. 9) 56.82 टक्क्यापर्यंत खाली आल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले.दरम्यान, रविवारी पानशेत येथे 1 मिलिमीटर पाऊस झाला, तर इतर तिन्ही धरणक्षेत्रांत पावसाचीउघडीप होती.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
रविवारचा पाणीसाठा
25.76 टीएमसी (88.38 टक्के)