रिमांडमध्ये देण्यात आलेल्या मुद्द्यांचा तपास यापूर्वीच झालेला आहे. तसेच, सर्व आरोपी त्यांच्या ताब्यात होते. त्यामुळे पोलिस एकत्रित तपास करू शकले असते. कोठडी कालावधीत त्यांना आरोपींच्या हस्ताक्षरांचे नमुने घेणे आवश्यक होते. तसेच आरोपींच्या अनुषंगाने तांत्रिक तपास झालेला आहे, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. आरोपींच्या वतीने अॅड. ऋषिकेश गानू, अॅड. विपुल दुशिंग आणि अॅड. पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवाद केला.