बारामती शहर व तालुक्यात युगेंद्र यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी सांभाळली. शिवाय बारामतीचा विकास हा शरद पवार यांच्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले होते. येथील महत्त्वाच्या संस्था शरद पवार यांनीच उभ्या केल्या असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा जन्मही नव्हता, तेव्हापासून मी राजकारणात असल्याचा पलटवार केला होता. शिवाय काहींना आत्तापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत, असा टोला युगेंद्र यांचे नाव न घेता लगावला होता.