

अजून दोन ते तीन दिवस शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे दुपारी उष्मा प्रचंड वाढेल. तसेच किमान तापमानात वाढ होईल. रात्रीच्या वेळी वाऱ्याचा वेग कमी आहे आणि ढगांमुळे उष्णता बाहेर पडायला जागा नाही. त्यामुळे शहरात रात्री कमालीचा उष्मा जाणवत आहे. यंदाचा मार्च गेल्या काही वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे.– डॉ. अनुपम कश्यपी, हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा