कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज शुक्रवारपासून सुरू होणार

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज शुक्रवारपासून सुरू होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज शुक्रवार (दि.8)पासून पुण्यात सुरू होत आहे. हे कामकाज 12 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोतदार आणि पुण्याच्या विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची उलटतपासणी होणार आहे.
कोरेगाव भीमामध्ये सन 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे या सुनावण्यांना महत्त्व आले आहे. कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक या दोन सदस्यीय आयोग स्थापन केला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी घेण्यात येत आहे. आंबेडकर यांची उलटतपासणी 8 आणि 9 फेब्रुवारी, पोतदार यांची 9 आणि 10 फेब्रुवारी, तर कदम यांची 12 फेब्रुवारी रोजी उलटतपासणी घेण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनात काही बदल होऊ शकतात. मात्र, पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news