शिक्षक भरतीच्या जाहिरातींना अखेर मुहूर्त सापडला

शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिलांच्या चौकशीचे आदेश
शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिलांच्या चौकशीचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणार्‍या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी (दि. 5) दुपारनंतर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणार्‍या उमेदवारांना 20 हजारांहून अधिक जागांच्या जाहिराती पाहण्यास उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणार्‍या शिक्षक भरती प्रक्रियेस खूप विलंब झाला आहे.

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, मराठी-इंग्रजी माध्यम वाद, केंद्र शाळेवर साधनव्यक्ती नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती. अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व सुमारे एक हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांसाठीच्या जाहिराती सोमवारी प्रसिद्ध होणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या 70 टक्के जागांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे 800 जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही, तर खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवरसुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तब्बल 16 हजार 500 जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती केल्या जाणार आहेत. उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त केल्या जातील. सोमवारी शिक्षक भरतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे देखील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news