बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई योजनेवरून राष्ट्रवादीच्याच दोन गटात सध्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. माझ्या सहीने ही योजना मार्गी लागल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते, यासंबंधी रविवारी (दि. २१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी मुंबईला मंत्रालयात या, कोणाच्या सहीने ही योजना झाली ते दाखवतो असे सांगितले. मला वरिष्ठांबद्दल टीकाटीप्पणी करायची नाही, पण जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कालवा नियोजन समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्याकडूनच हे काम मार्गी लागणार असे पवार म्हणाले. Ajit Pawar