लई भारी लोकांनाही लोळवण्याची माझ्यात ताकद : शरद पवार
आळंदी : पुढारी वृत्तसेवा : ‘माझ्याबाबत सातत्याने वय झाल्याचे विषय काढले जातात. मी नेहमी त्यावर बोलत असतोच. मात्र, शेतकरी मित्रांनो, तुम्ही काही काळजी करू नका. अजूनही लई भारी लोकांना लोळवण्याची ताकद माझ्यात आहे. सध्याचे सरकार शेतकरी हिताचे नाही त्याचबरोबर शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत बोलण्याची नेतृत्वात धमक नाही. आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल आणि बदल घडवावाच लागेल. काळजी करू नका आपणच नक्कीच बदल घडवू, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी आळंदीजवळील चर्होली खुर्द (ता. खेड) येथील बैलगाडा घाटात व्यक्त केले.
अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतीचा अनुभव घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी बैलगाडा शर्यती’चे आयोजन करण्यात आले आहे. चर्होली खुर्द येथील साहेब केसरी बैलगाडा घाटात फायनल स्पर्धेसाठी स्वतः पवार उपस्थित होते. या वेळी आपल्या नेहमीच्या शैलीतून त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि स्पर्धेचे आयोजक व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा :