

पुणे रेल्वे विभागात 60 ते 70 निवृत्त कर्मचारी एटीव्हीएम मशिनवर तिकीट काढून देण्यासाठी कार्यरत आहेत. असे मशिन देशातील प्रत्येक स्थानकावर आहेत. त्या सर्व ठिकाणी रेल्वे प्रशासनाने कॉन्ट्रॅक्ट बेस पध्दतीने तरुणाईची भरती केली तर देशातील जवळपास 10 ते 15 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या धोरणाबाबत फेरविचार करून निवृत्त कर्मचार्यांऐवजी तरुणाईला संधी द्यावी, अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे.
रेल्वेमध्ये सततच भोंगळ कारभार सुरू असतो. 60 वर्षे झालेल्या रिटायर्ड कर्मचार्यांना पुन्हा कामावर घ्यायची काय गरज आहे. ते नियमातही बसत नाही. शहरात असंख्य मुले-मुली रोजगाराविना फिरत आहेत. त्यांना रोजगार देण्याऐवजी रिटायर्ड कर्मचार्यांना पुन्हा का घेतात? हे चुकीचे आहे. रेल्वेने तातडीने यात बदल करून तरुणाईला संधी द्यावी.– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
रेल्वेच्या पॉलिसीनुसार एटीव्हीएम फॅसिलेटर म्हणून फक्त निवृत्त कर्मचार्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. कॉन्ट्रॅक्ट किंवा कायम पध्दतीने यावर कोणाचीही नेमणूक करता येत नाही. आमच्याकडील वर्ग 'ड'मधील निवृत्त कर्मचारी सध्या या एटीव्हीएम मशिनवर कार्यरत आहेत.– डॉ. रामदास भिसे (आयआरटीएस),जनसंपर्क अधिकारी तथा विभागीय वाणिज्यव्यवस्थापक, पुणे विभाग