

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याची मागणी विरोधी पक्षनेते असताना शासनाकडे केली होती. तेव्हापासून ते याबाबत पाठपुरावा करत आहेत. छत्रपती श्रीशिवरायांच्या मानव कल्याणकारी कार्याचा जिवंत वारसा राजगडाला लाभला आहे. वेल्हे तालुक्याला राजगडाचे नाव दिले जाणार असल्याने नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे.-भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूध संघ (कात्रज)