प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पदपथांवर पथारी व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. दुकानांपुढे एका टपरीसाठी दरमहा सुमारे 15 ते 20 हजार रुपये मिळत आहेत. यामुळे परिसरात अनधिकृत टपर्यांची संख्या वाढली आहे. तसेच चायनीज, मिसळ आणि स्नॅक्स सेंटर, वडापाव, ज्यूस, अंडाभुर्जी, चहा, सॅन्डविच, पराठा आदी खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून दररोज सुमारे 500 रुपये घेतले जात आहेत. ठिकाणानुसार पैसे कमी जास्त केले जात आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आशीर्वादाने पदपथावर टपर्या थाटल्या जात असून, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.