

रस्ता केल्यानंतर तो समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी पंधरा दिवसांतच खोदण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. कोणतेही काम केव्हा केले जाणार आहे, याचे नियोजन आधीच केले जाते. असे असताना रस्ता करताना संबंधित अधिकार्यांनी पथ विभागाला सांगणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता काम झाल्यावर रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यास नोटीस बजावण्यात येणार आहे.– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.