पुण्यावरचा वाहतुकीचा ताण खूप वाढतोय. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. माझी दोन्ही दादांना विनंती आहे की, आता शहर फार वाढू देऊ नका. हे शहर एकेकाळी मस्त, निवांत हवेचे ठिकाण होते. ते शहर पुणेकरांना परत द्या.
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
लोहगाव विमानतळ लष्करी असल्याने ते सतत अलर्ट मोडवर असते. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब योग्य आहे. त्यामुळे आपण आता नवे विमानतळ पुरंदरला करणार आहोत.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
पुण्यात वारंवार इतके मोठे नेते का येतात, केंद्रातील मंत्रीही येतात. कारण त्यांना सांगायचे आहे की, पुणेकरांवर आमचे लक्ष अन् प्रेमही आहे.
– नीलम गोर्हे , उपसभापती