तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या तळेगाव दाभाडे परिसरात कधी उन्ह तर कधी पाऊस असे वातावरण असल्यामुळे भात, सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. या पिकांवर बुरशीचा रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सध्या तळेगाव परिसरात दिवसा कडक उन्ह पडत असून, सायंकाळच्या सुमारास अचानक पाउस पउत आहे. तर, कधी नुसतेच ढग दाटून येत आहेत. छत्र्या, रेनकोट न घेता घराबाहेर नागरिक पडले कही अचानक पाऊस सुरू होवून धांदल उडते. याचा परिणाम पिकांबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे.