चारसूत्री पद्धतीत भात रोपे कमी लागत असून भात लावणीस कमी वेळ लागतो व बियाणे कमी लागल्यामुळे बियाणे खर्च ही कमी येतो. युरिया ब्रिकेट खतामुळे भाताच्या उत्पादनात 2 ते 3 पट वाढ होणार असून कृषी विभागाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आम्हा शेतकर्याना निश्चितच फायदा होत आहे.– दत्तात्रय तोंडे,शेतकरी, मळवंडी ठुलेसुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान प्रगतशील शेतकर्यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, उत्पादन खर्च कमी करणे, भात चारसूत्री पद्धत क्षेत्र वाढविणे हा प्रकल्प राबविण्याचा मुख्य उद्देश आहे.– विकास गोसावी,कृषी सहायक, मळवंडी ठुले