पुणे; पुढारी वृत्तसेवा : रिक्षाचालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापण्याचा निर्णय नऊ वर्षांपूर्वी घेण्यात येऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. ती तातडीने करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. पुण्याच्या मूलभूत प्रश्नांकडे धंगेकर विधानसभेत सरकारचे लक्ष वेधत आहेत. धंगेकर यांनी रिक्षाचालक-मालक कल्याणकारी महामंडळाची घोषणा होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. या महामंडळाची कल्पना काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी 2013 मध्ये विधिमंडळात मांडली होती याकडे लक्ष वेधले.
पुण्यातील आरटीओ कार्यालयातील स्मार्ट कार्ड छपाई केंद्र रद्द करण्याच्या मागणीचा फेरविचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पुणे आरटीओ येथे देशात सर्वाधिक वाहनांची नोंदणी होते. त्यामुळे वाहन नोंदणी आणि परवाना स्मार्ट कार्ड छपाई केंद्र तेथे करण्यात येणार होते. तशी घोषणाही झाली. मात्र नंतर हा आदेश निघताना पुण्याचा उल्लेख वगळण्यात आला. ही बाब प्रशासकीयदृष्ट्या गैरसोयीची आहे. त्यामुळे हे केंद्र मूळ घोषणेप्रमाणे पुण्यात सुरू करावे, असे धंगेकर म्हणाले.
हेही वाचा