पुणे : आंब्याचा हंगाम संपल्याने अन्य फळांना मागणी | पुढारी

पुणे : आंब्याचा हंगाम संपल्याने अन्य फळांना मागणी

पुणे : मॉन्सूनच्या आगमनानंतर कर्नाटकातील आंब्याचाही हंगाम संपल्याने बाजारात अन्य सर्व प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कलिंगडाच्या भावात किलोमागे पाच रुपये, पपई एक ते दोन रुपये तर सिताफळ व डाळींबाचे भाव दहा टक्क्यांनी वधारले आहेत. पावसास सुरुवात झाल्यानंतर लिंबाच्या मागणीत घट होऊन दरातही घसरण होईल या अपेक्षेने शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात अपरिपक्व लिंबाची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे.

त्याच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने लिंबाचे दर 15 किलोंच्या गोणीमागे 50 रुपयांनी उतरले आहेत. किरकोळ बाजारात दहा रुपयांना दहा लिंबाची विक्री करण्यात येत आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने दर स्थिर आहेत. फळबाजारात रविवारी (दि. 2) संत्रीची 1 टन, मोसंबी 15 ते 20 टन, डाळिंब 35 ते 40 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते एक हजार सातशे गोणी, कलिंगड 2 ते 3 टेम्पो, खरबूज 4 ते 5 टेम्पो, पेरू 600 ते 700 क्रेट्स, चिक्कू 100 डाग, सीताफळाची 1 टन इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : अननस (1 डझन) : 100-450, लिंबे (प्रतिगोणी) : 50-250, मोसंबी : (3 डझन) : 250-500, (4 डझन) : 120-280, संत्रा : (10 किलो) : 300-1500, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 70-220, गणेश : 10-30, आरक्ता 70-220, कलिंगड : 20-28, खरबूज : 10-30, पपई : 10-18, पेरू (वीस किलो) : 250-400, चिक्कू (दहा किलो) : 100-600, सीताफळ (1 किलो) : 30 ते 180.

हेही वाचा

चाकण : कांद्याच्या भावात वाढ, पालेभाज्यांत घसरण

पुण्यात फळभाज्यांचे भाव कडाडले

Back to top button