‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असावे: ठाकरे | पुढारी

‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असावे: ठाकरे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे,’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा बुधवारी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. अमोल कोल्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार अशोक पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारकदेखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे.

खते, कीटकनाशके 63 विक्रीपरवाने निलंबित

संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणार्‍यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरूपात सादर करण्यात याव्यात.’ उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘तरुणांमध्ये ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, स्मारक याबाबत आकर्षण आहे. अशा ठिकाणी आता गर्दी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक आकर्षक स्मारक झाले पाहिजे, तसा आराखडा पुन्हा शिखर समितीसमोर सादर करावा.’

किती क्षेत्रावर होणार स्मारक

भीमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर, तर वढू (बु.) येथे सुमारे 4 एकर क्षेत्रावर स्मारक साकारण्यात येणार आहे.

आराखड्यात या बाबींचा समावेश

शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखड्यात स्मारक परिसरात भव्य शिल्प, अ‍ॅम्फी थिएटर, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौरऊर्जा पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

हेही वाचा

पाऊसाविना खरीप पेरण्यांचा खोळंबा

..मग ऑडिट कधी होणार: राजू शेट्टींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

जेऊरमध्ये पाच दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास

Back to top button