नाशिक : प्रेमविवाहानंतर तीन महिन्यांत विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप

नाशिक : प्रेमविवाहानंतर तीन महिन्यांत विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रेमविवाह होऊन अवघे तीन महिने झालेल्या 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना खैरे गल्लीतील दीक्षित चाळ परिसरात घडली. गौरी मयूर भावसार असे या नवविवाहितेचे नाव आहे. तिच्या सासरच्या नातलगांनी तिचा छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला.

पंचवटीतील गौरी व भद्रकालीतील मयूर यांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. गौरीने शनिवारी (दि. 30) घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. गौरीच्या सासरच्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत गौरीवर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा गौरीच्या माहेरच्या नातलगांनी घेतला. त्यामुळे पोलिसांनी गौरीच्या सासू, सासर्‍यांना ताब्यात घेतले. त्यानंतरच गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सासरच्या नातलगांविरोधात गौरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news