नाशिक : वेगवेगळ्या अपघातांतील दोघा जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सुभाष वराडे (२५, रा. आरटीओ कार्यालयामागे, पेठ रोड) दुचाकीने आरटीओ कॉर्नरकडून रासबिहारी रस्त्याने जात असताना राजमाता मंगल कार्यालयाजवळ त्याची दुचाकी घसरली होती. या अपघातात जखमी झाल्याने वराडे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर वीरेंद्र किशोर रॉय (३८, रा. गजा
नन चौक, पंचवटी) यांचाही रिक्षा अपघातात जखमी झाल्याने मृत्यू झाला.