Sangamner Hailstorm Crop: संगमनेरात गारपिटीचा तडाखा; 125 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

180 शेतकरी संकटात; कांदा, टोमॅटो, टरबूज पिकांना मोठा फटका
Ahilyanagar Crop Damage
Ahilyanagar Crop DamagePudhari
Published on
Updated on

शिवाजी क्षीरसागर

संगमनेर : अवकाळी पावसाने गुरुवारी संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी अचानक हजेरी लावून दाणादाण उडवली. पठार भागात गारपीट झाली. जांबुत खुर्द व जांबुत बुद्रुक या दोन गावांमधील सुमारे 125 हेक्टर वरील 180 शेतकऱ्यांचे मोठी आर्थिक हानी झाली. कांदा, टोमॅटो, टरबूज ,पपई, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली.

Ahilyanagar Crop Damage
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे मोठे विधान, म्हणाल्या...

गेल्या तीन-चार दिवसांपासून संगमनेर तालुक्यात वातावरणात बदलले आहे. अवकाळी पाऊस होईल, हा अंदाज वर्तविण्यात आला होता. गुरुवारी (दि.19) गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी अवकाळी पावसाने संगमनेर तालुक्यात दमदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. कोकणगाव, साकुर, घारगाव, जांबुत आदी गावात पावसानेे हजेरी लावली, मात्र पठारातील काही भागात अवकाळीसह गारपिट झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शेतात सध्या कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई, गहू आदी भाजीपाला पिके उभी आहेत. सुदैवाने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील गहू काढल्यामुळे त्यांच्यावरील नैसर्गिक संकट टळले आहे.

Ahilyanagar Crop Damage
Pimpalgaon Rotha Irrigation Project: पठार भागासाठी दिलासा! पिंपळगाव रोठा उपसा सिंचन योजनेला वेग

जांबुत बु व जाबुंत खुर्द या दोन गावांमध्ये गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनामा करावेत, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली केली होती. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे केले आहेत. 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. जांबुत बुद्रुक येथे 70 शेतकऱ्यांचे 50 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. जाबुंत खुर्दमधील 110 शेतकऱ्यांचे 75 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. असे एकूण 180 शेतकऱ्यांचे 125 हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कधी व किती भरपाई मिळणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. संगमनेर तालुक्यात इतर भागात पाऊस पडला असला तरी, अधिक नुकसान मात्र दोनचं गावात झाले आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नुकसान अहवाल शासनाला सादर केला आहे.

Ahilyanagar Crop Damage
Bhenda Theft Police Controversy: भेंड्यात चोरी प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह; पकडलेला चोरटा सोडल्याचा आरोप

‌‘अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र जाबुंत खुर्द व जांबुत बुद्रुक या दोनचं गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले . 125 हेक्टर कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई व भाजीपाला पिकांचा यामध्ये समावेश आहे. 180 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असा अहवाल सादर केला आहे.

रेजा बोडके, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news