जळगाव क्राईम : पैशांसाठी विवाहितेचा घातपात, मृत्यूनंतर माहेरच्यांचा आरोप | पुढारी

जळगाव क्राईम : पैशांसाठी विवाहितेचा घातपात, मृत्यूनंतर माहेरच्यांचा आरोप

जळगाव- तालुक्यातील मनेरखेडा शिवारात विवाहितेने रात्री घरात जीवन संपवल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद परिषद अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विवाहितेच्या घरच्यांनी(माहेरच्यांनी) तिला मारहाण करून गळफास दिल्याचा आरोप केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगर येथे ममता रतिलाल राठोड ही महिला आपल्या पती रतीलाल भोजू राठोड आणि एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मोलमजूरी करून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, दि. २४ रोजी रात्री १० वाजता राहत्या घरात विवाहिता ममता हिने साडीने गळफास घेवून जीवन संपविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी धाव घेत खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विवाहितेच्या माहेरच्यांनी धाव घेवून एकच आक्रोश केला होता. ही आत्महत्या नसून विवाहितेला तिचे पती रतिलाल राठोड यानेच पैशांसाठी दारून पिऊ मारहाण करून गळफास दिल्याचा आरोप विवाहितचा भाऊ मुकेश वसंत चव्हाण याने केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे.

हेही वाचा –

Back to top button