चाळीसगाव येथे चारचाकी पलटी; तिघांचा जागीच मृत्यू | पुढारी

चाळीसगाव येथे चारचाकी पलटी; तिघांचा जागीच मृत्यू

जळगाव, पुढारी ऑनलाईन : पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी चारचाकी रात्री साडेदहा वाजता पलटी झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावानजिक असणाऱ्या नांदगाव रस्त्यावर घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील डोंगर गाव येथील काही मजूर नांदगावकडे जात असताना चाळीसगाव तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ चारचाकी (एम एच 19 ए सी 5604) ही गाडी पलटी झाली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले.

त्यातील दोन जण गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रात्री रवाना करण्यात आले आहे. तर चार जणांवर चाळीसगाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे रवाना केले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात अवकाळीपासून सुरू असल्याने भरधाव वेगात जात असलेल्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली होती. यातील चार जण गाडी खाली दबली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जण गाडीत अडकून पडले होते. त्यांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धावत येत रुग्णालयात भरती केले आहे.

या अपघातात चार ते पाच जण गंभीररित्या जखमी आहेत. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच गावातील हे मजूर ठार झाल्याने पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Back to top button