शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील | पुढारी

शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे. यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असे होत नाही. तीन तासांची सभा त्यात कोणती लढाई, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावताना त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, अशी खोचक टिप्पणीही केली.

गुलाबराव पाटील जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिवतीर्थावर होणार्‍या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले. गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, असा टोला लगावत आता नेमकं कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे  लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे :

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजी करणार्‍या लोकांवर सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकून ते बाहेर येणारच नाहीत, असे ठेचले पाहिजे, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी पीएफआय कार्यकत्र्यांचा समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, या देशाचं अन्न खायचं, हवा घ्यायची आणि पाकिस्तानचे नारे द्यायचे मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिले पाहिजे. मला तर असे वाटते कोणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो, पहिला देश महत्त्वाचा आहे. असे असताना जर देशाच्या बाबतीत अशी घोषणाबाजी होत असेल तर सरकारची आणि आपली जबाबदारी आहे की अशा वृत्तीला ठेचून टाकले पाहिजे. अशा प्रकारची घोषणाबाजी होत असल्याचे मी पण चॅनलवर पाहिले, हाच मोठा पुरावा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button