नाशिक : पत्नीचा गळा चिरून पतीची आत्महत्या, घटनेने शहरात खळबळ
नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
चारित्र्याचा संशय घेत व कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत गळा चिरला. त्यानंतर पतीने तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मखमलाबाद शिवारातील रामकृष्णनगरला (शांतीनगर) मंगळवारी (दि.7) दुपारी 3.30 वाजता घडली आहे.
या घटनेत संध्या राजू ठाकूर (45) गंभीर जखमी झाली आहे. तर पती राजू रतनसिंग ठाकूर (50) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद शिवारातील शांतीनगर रामकृष्ण नगर असलेल्या लक्ष्मी रेसिडेन्सी सदनिकेत ठाकूर दाम्पत्य दोन मुलांसमवेत राहतात. मंगळवारी दुपारी घरी कोणी नसताना दोघा पती-पत्नीत वाद झाले. त्यातून पती राजू याने पत्नी संध्या हीस शिवीगाळ करीत गळ्यावर शस्त्राने वार करून गळा चिरला. संध्या या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर पती राजू याने घराच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या गॅलरीतून उडी मारली. त्यात डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. पत्नी संध्या गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- प्लास्टिक उठले जलचरांच्या जीवावर!
- धक्कादायक! आईने मित्राला मुलीवर बलात्कार करायला लावले अन् ४ वर्षांत ८ वेळा स्त्रीबीज विकले
- गडकिल्ल्यांचे संवर्धन करा : मंडलिक