नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा
तारुखेडले येथे रविवारी (दि.29) दुपारी 11.30 च्या सुमारास गट क्र. 7 मधील सागर वाळू जगताप यांच्या शेतात दिवसा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे.
वनविभागाने तीन दिवसांपूर्वी मागणीनुसार पिंजरा लावला होता. त्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाल्यामुळे तारुखेडले परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी बिबट्याची दहशत मात्र कायम आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद झाला.