माफी मागा आणि मगच अयोध्येला या : साक्षी महाराजांचा राज यांना सल्ला

माफी मागा आणि मगच अयोध्येला या : साक्षी महाराजांचा राज यांना सल्ला
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि मगच अयोध्येत पाय ठेवावा, अशी आक्रमक भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनीही राज ठाकरेंनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि दर्शनाला यावे, एवढीच अयोध्यावासीयांची मागणी आहे. राज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांबाबतचे वक्तव्य चुकीचेच आहे. उत्तर भारतीयांबाबत तुम्ही कसे बोलू शकता, असा सवाल साक्षी महाराज यांनी राज ठाकरे यांनी केला आहे.

खासदार साक्षी महाराज नाशिक दौर्‍यावर असून, माध्यम प्रतिनिधींसमोर त्यांनी भूमिका मांडली. साक्षी महाराज म्हणाले, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. अटक पासून कटकपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व देश एक आहे. सगळ्यांना सगळ्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. अयोध्यावासीयांची एवढीच अपेक्षा आहे की राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि दर्शनाला यावे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानवापीबाबत साक्षी महाराज म्हणाले की, ज्ञानवापीबाबतचे सत्य समोर आले पाहिजे, या मताचे आमचे सरकार आहे. सत्य तुम्ही फार काळ लपवू शकत नाही. पूर्ण जगात ज्या ठिकाणी शिवाचे मंदिर आहे, त्या ठिकाणी नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते. त्यामुळे काशीमध्येही नंदीची तपश्चर्या सफल झाल्याचे वाटत आहे. मुस्लीम धर्मगुरुंनीही सांगितले आहे की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू, हे सगळ्यांच्या हिताचेही आहे, असे साक्षी महाराज यांनी सांगितले. समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा याबाबत आज ना उद्या निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news