कोणतीही हुकुमशाही चालणार नाही : अजित पवार यांचा राज ठाकरे यांना इशारा | पुढारी

कोणतीही हुकुमशाही चालणार नाही : अजित पवार यांचा राज ठाकरे यांना इशारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन :  काल औरंगाबाद येथे पार पडलेल्या भाषणावरुन अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे केलेले भाषण म्हणजे मागील भाषणाचेच रिपीटेशन आहे. येथे कायद्याचे राज्य आहे. राज्य घटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळे भोंग्याबाबत कोणतीही हुकुमशाही चालणार नाही असा इशारा अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला.

नाशिकमध्ये कृषी विभागातर्फे आज (दि.2) राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा पार पडला. राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांना विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी २९७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांच्या औरंगाबाद येथील भाषणाचा चांगलाच समाचार घेतला.

कारण नसताना पवार साहेबांचे नाव घ्यायचे आणि प्रसिद्धी मिळवून घ्यायची असे झाले आहे. पवार साहेबांवर काही बोलले म्हणजे प्रसिद्दी मिळते म्हणून काहीजण विनाकारण नको ते बोलतात.  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस कारवाई करतील असा थेट इशारा अजित पवार यांनी राज ठाकरे यांना यावेळी दिला.

हेही वाचा :

Back to top button