वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात ; नाशिकचे चार ठार, 22 जखमी | पुढारी

वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात ; नाशिकचे चार ठार, 22 जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : वराड घेऊन परतणाऱ्या गाडीला वैजापूर येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नाशिकचे चार जण जागीच ठार झाले आहेत, तर 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शिवराई फाटा येथे पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात लग्न लावून हे वऱ्हाडी नाशिकला जात होते.  या अपघातात कविता बाबासाहेब वडमारे (45), प्रज्ञा गौतम गायकवाड (17) मुलगा दिपक वर्‍हाळे (वय 8 वर्ष), ललिता पवार (48) सर्व राहणार अंबड जि. नाशिक, यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमी झालेल्यापैंकी चार जणांवर  औरंगाबाद मध्ये उपचार सुरू आहेत. इतर जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकमधील अंबड इथले नागरिक आयशर ट्रकमधून लग्नासाठी जालना जिल्ह्यातील मंठा येथे गेले होते. लग्नसमारंभ झाल्यावर पुन्हा नाशिककडे ते परतत होते. त्यावेळी वैजापूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू आयशर ट्रकला समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघेजण ठार तर जवळपास 35 जण गंभीर जखमी झाले. यातील तिघेजण कविता वडमोर, प्रज्ञा गायकवाड व मोनू वाव्हळे या तिघी जागीच ठार तर ललिता पवार ही महिला नाशिकला उपचारासाठी नेत असताना गतप्राण झाली.

Back to top button