मुंबई पोलिसांची आठ वर्षांनी जिल्ह्याबाहेर बदली सक्तीची नाही!

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय File photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई पोलिस आयुक्तालयात सेवेत असणारे निःशस्त्र उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक व निरीक्षकांची आठ वर्षांनी जिल्ह्याबाहेर बदली करणे बंधनकारक नाही, असे स्पष्ट करताना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

Bombay High Court
दाऊद व्यक्तिगत दहशतवादी, त्याच्या टोळीतील सदस्यांना UAPA लागू होत नाही - मुंबई उच्च न्यायालय

मुंबईत अनेक पोलिस अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे तळ ठोकून असतात. याला आक्षेप घेत मुलुंड येथील अंकुर पाटील यांनी उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. शासकीय पत्रकात आठ किंवा सहा वर्षांच्या सलग सेवेचा कालावधी संबंधित अधिकार्‍याला वारंवारच्या बदलीमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी संरक्षण म्हणून नमूद केला आहे. त्यामुळे आठ वर्षांनी बदली केलीच पाहिजे, असे कोणतेही बंधन नसल्याचे निरीक्षण नोदवत खंडपीठाने जनहित याचिका फेटाळून लावली.

Bombay High Court
हुंड्यासाठी खून केल्यानंतर पत्नीच्या संपत्तीवर नवऱ्याचा हक्क नाही - मुंबई उच्च न्यायालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news