मुंबई: मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका पेटवला

मुंबई: मनसैनिकांनी  मुलुंड टोलनाका पेटवला

भांडुप, पुढारी वृत्तसेवा: मनसेच्या टोल नाका विरोधी आंदोलनाला सोमवारी (दि. ९) हिंसक वळण लागले. मुलुंड टोल नाक्यावर आधी मनसे नेते अविनाश जाधव यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. मात्र, त्यांना ताब्यात घेतल्यावर काही मनसैनिकांनी टोल नाका पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ठाण्याकडे जाणाऱ्या टोल नाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल आणि टायर पेटवून टाकण्यात आले आहे. यामुळे केबिन आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news