नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या तक्रारीचे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले होते. राष्ट्रपतींनी हे पत्र पुढील कारवाईसाठी केंद्रीय गृह विभागाकडे पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती कार्यालयाने उदयनराजेंना याबाबतची माहिती दिल्याचे कळतेय.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या अवमानजनक वक्तव्यानंतर संतापलेल्या उदयनराजेंनी २३ नोव्हेंबरला राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे राज्यपालांच्या वक्तव्याच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी राष्ट्रपतींना केली होती. या पत्राची दखल घेत राष्ट्रपतींच्या त्यावरच्या अभिप्रायासह केंद्रीय गृहखात्याकडे पाठवण्यात आल्याचे कळतेय.
हेही वाचा :