चेंबूर विक्रोळी दुर्घटना : मृतांच्या वारसांना पाच, तर केंद्राकडून दोन लाखांची मदत | पुढारी

चेंबूर विक्रोळी दुर्घटना : मृतांच्या वारसांना पाच, तर केंद्राकडून दोन लाखांची मदत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : चेंबूर विक्रोळी दुर्घटना : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

सीएम ठाकरे यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.

अधिक वाचा 

एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे. जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

चेंबूर विक्रोळी दुर्घटना

चेंबूर विक्रोळी दुर्घटनेमधील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार करण्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. केंद्राकडूनही दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाउस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा 

सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे अशी सूचना केली आहे.

कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी.

तसेच सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले.

पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्याठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी.

रस्ते मोकळे करावेत, वाहतुकीवर परिणाम झालेला आहे मात्र लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.

हे ही वाचलं का? 

Back to top button