नवी मुंबई : पुढारी वार्ताहर : मुस्लिम समाज देशाचा भाग असून, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात या समाजाचेही मोठे योगदान आहे. सध्या काही जण मुस्लिम समाजात 'भीती निर्माण करून राजकारण करीत आहेत. पण मुस्लिम समाजाने काळजी करण्याचे कारण नाही. राज्यात सर्व समाज सुरक्षित राहतील, याची काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागातर्फे रविवारी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दिकी, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला, राज्यप्रमुख इंद्रिस नायकवडी, राज्य कार्याध्यक्ष वसीम बुन्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, आर्थिक कारणांमुळे अल्पसंख्याक समाजात अनेक मुली उच्चशिक्षण घेत नाहीत. पण शासनाने आता आठ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींला उच्चशिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ सर्वच जातीधर्मातील मुलींना मिळणार आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गतवर्षी शासनाने ५०० कोटी दिले होते. यंदा १५०० कोटी रुपये देण्याचा प्रयत्न आहे. तसेच नांदेड, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे उर्दू हाऊस सुरू करण्याचा मानस आहे.
प्रदेशाअध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, काँग्रेस ७० वर्षे सत्तेत असताना जे निर्णय घेऊ शिकले नाही. ते गेल्या सात-आठ महिन्यांत महायुती सरकारने घेतले आहेत. महाविकास आघाडीत निर्णय घेताना अडचणी येत असत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीत सहभागी झाल्यांनतर अल्पसंख्याकांसाठी निर्णय घेता येत आहेत.
हेही वाचा :