Article 370 verdict : ‘३७० रद्द’ निर्णयाचे स्वागतच पण…; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Article 370 verdict : ‘३७० रद्द’ निर्णयाचे स्वागतच पण…; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालायाच्या निर्णयाचे स्वागत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र मतदानापूर्वी देशभर पसरलेले काश्मीरी पंडित पुन्हा आपल्या घरी परतून खुल्या वातावरणात मतदान करतील याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मादी घेणार का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१९ ला कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने पाठींबा दिला होता. आजही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. न्यायालयाने सप्टेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुका लवकरात लवकर होतील आणि जनतेला मतदानाचा अधिकार मिळेल. मात्र निवडणुकीपूर्वी पाकव्याप्त काश्मीर आपण घेतला तर संपूर्ण काश्मीरमध्ये निवडणुका होतील आणि याचा देशवासीयांना अभिमान वाटेल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पण निवडणुकीत मतदान करण्यासाठी घर सोडून देशभर पसरलेले काश्मीरी पंडित पुन्हा घरी परतणार का? आणि खुल्या वातावरणात मतदान करणार का? याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार का? असे सवाल ठाकरे यांनी केले आहेत.


हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news