मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत आज (दि.६) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांना मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. याप्रसंगी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट देण्यात आली.
तसेच कुलगुरू राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, झाल्याचं पाहिजेत, अशा आशयाच्या घोषणा देत मनविसे शिष्टमंडळाने खाली जमिनीवर बसून ठिय्या मारला. यावेळी सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, प्रमुख संघटक यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे आदी उपस्थित होते.
हेही वाचा