![Maharashtra Politics](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FUntitled-design-14.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनच्या संग्रहालयातील छत्रपती शिवरायांची वाघनखं पुढच्या तीन वर्षांसाठी राज्य शासन भारतात आणत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवारी १ ऑक्टोबर रोजी लंडनला रवाना झाले आहेत. परंतु या वाघनखांवरून सध्या राज्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन विरोधी पक्षातून सरकारला धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरे यांनी "ही वाघनखे शिवकालीन आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत" याचा सरकारने खुलासा करावा म्हटलं आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Maharashtra Politics)
संबधित बातम्या
आदित्य ठाकरे यांनी," छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सामान्य जनतेला पाहता यावीत, यासाठी महाराष्ट्रास तीन वर्षांसाठी देण्यास व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने मान्य केले आहे. ही वाघनखे शिवकालीन आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत याचा सरकारने खुलासा करावा. अशी मागणी केली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्याला उत्तर दिले आहे,
"छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले? आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय. इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?
हेही वाचा