सिंघमसारखे चित्रपट धोकादायक संदेश देतात : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गाैतम पटेल यांचे मत
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणालाही न्याय मिळविण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागते. जिथे निर्दोषपणा किंवा दोषी ठरवला जातो. या प्रक्रिया संथ असतात. त्या असाव्या लागतात. कारण एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जपणे या मूलभूत तत्त्वाचा विचार होतो. मात्र ‘सिंघम’ ( Singham ) सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी ‘हीरो कॉप’ ची प्रतिमा रंगवत समाजात धोकादायक संदेश देतात. चित्रपटात नायक असणार्या पोलिसाद्वारे ‘तत्काळ न्याय’ ही प्रक्रिया केवळ चुकीचा संदेशच देत नाही तर कायद्याच्या योग्य प्रक्रियेसह अधीरतेला प्रोत्साहन देते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी व्यक्त केले . भारतीय पोलीस फाउंडेशनच्या वर्धापन दिन आणि पोलीस सुधारणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.
Singham क्लायमॅक्स सीनमध्ये दिलेला संदेश धोकादायक
या वेळी गौतम पटेल म्हणाले की, चित्रपटांमध्ये न्यायाधीशांची प्रतिमा ही नम्र, भित्रा, जाड आणि बहुतांश वेळा अत्यंत वाईट पोशाखात परिधान केलेले दाखविले जाते. याविरुद्ध चित्रपटात दाखवले जाणारे हिरो ( नायक ) एकहाती न्याय देतात असे चित्रपटात दाखवले जाते. उदाहारण सिंघम चित्रपटात विशेषत: त्याच्या क्लायमॅक्स सीनमध्ये दाखवण्यात आले आहे की, संपूर्ण पोलीस दलच राजकारण्याविरोधात उतरले आहे. आणि न्याय मिळाला आहे हे दाखवले आहे; पण विचार केला पाहिजे “तो संदेश किती धोकादायक आहे.”
कोणालाही न्याय मिळविण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागते
कोणालाही न्याय मिळविण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागते. जिथे निर्दोषपणा किंवा दोषपणा ठरवला जातो. या प्रक्रिया संथ असतात. त्या असाव्या लागतात. कारण एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जपणे या मूलभूत तत्त्वाचा विचार होतो. ही प्रक्रिया घाईगडबडीत किंवा त्यासाठी “शॉर्टकट” पवारले तर आम्ही कायद्याचे नियम मोडतो, असेही न्यायमूर्ती पटेल यांनी सांगितले.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती पटेल यांनी उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक प्रकाश सिंग यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, ज्यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यांनी सिंह यांच्या “पोलिस सुधारणांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक आणि अथक प्रयत्नांची” नोंद केली, ज्यामुळे 2006 च्या पोलिस सुधारणांचा निकाल लागला. “पोलीस सुधारणांना एकाकी किंवा वेगळ्या चौकटीत पाहिले जाऊ शकत नाही. इतरही महत्त्वपूर्ण सुधारणा आहेत, असेही ते म्हणाले.
पोलिसांची ‘गुंड, भ्रष्ट आणि बेजबाबदार’ अशी प्रतिमाही समाजात लोकप्रिय आहे. जेव्हा जनतेला वाटते की न्यायालये त्यांचे काम करत नाहीत, तेव्हा पोलिस पाऊल ठेवतात. म्हणूनच जेव्हा बलात्काराचा आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना चकमकीत मारला जातो, तेव्हा लोकांना वाटते की, योग झाले. न्याय मिळाला आहे, त्यांना वाटते, पण हे योग्य आहे का?”, असा सवाल करत आपल्या लोकप्रिय संस्कृतीत भारतीय चित्रपटांमध्ये अशा प्रकारची दृश्ये किती प्रकर्षाने दिसून येतात याचाही विचार करा, असे आवाहनही न्यायमूर्ती पटेल यांनी केले.
#BombayHighCourt judge Gautam Patel said that films like ‘Singham’ send out harmful message by portraying a cinematic image of a “hero cop”. #Singham #Court | @journovidya https://t.co/e059ngP0YN
— IndiaToday (@IndiaToday) September 22, 2023
हेही वाचा :