Insurance company: चालकाचे लायसन्स कालबाह्य झाले तरी भरपाई द्यावीच लागेल; विमा कंपनीला हायकोर्टाचा दणका
मुंबई : पुढारी वृत्तसेवा: रस्ते अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गाडीच्या चालकाचे लायसन्स कालबाह्य झाले असले तरी विमा कंपनीला मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई ही द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने विमा कंपनीला चांगलाच दणका दिला.
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड या विमा कंपनीला सहा आठवड्यांत महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई (Driver’s license) देण्याचा आदेश दिला आहे.
पुण्यातील आशा बाविस्कर ही महिला दुचाकीवरून पुण्यातील हडपसरकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार दिली. या अपघातात महिलेचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने अपघातग्रस्त गाडीच्या चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स कालबाह्य झाल्याच्या आधारे विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यापासून सूट देताना मृत महिलेच्या कुटुंबीयांना ट्रक मालकाने नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला.
या आदेशाला महिलेच्या कुटुंबीयांनी आव्हान दिले होते. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांनी सुनावणी करताना ग्राहकाला दिलासा देणारा निर्णय दिला.
हेही वाचा:
- Karnataka High Court : ‘महिला मृतदेहांसोबत लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी’ कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरकारला शवागारांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासह अन्य महत्वपूर्ण निर्देश
- Thane News | शिंदे गटाकडून जितेंद्र आव्हाडांना ठार मारण्याचा कट, ‘राष्ट्रवादी’ची पोलिसात तक्रार
- Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा